
#सावरगाळी नंतर मानिकवाडीच्या शेतकर्याला लाखोचा फटका!
#हत्तीचा बंदोबस्त करण्यात वनखाते अपयशी. लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका हा अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेला तालुका म्हणून ओळखला जातो.अशा तालुक्यात जंगली प्राण्याकडुन कधी पिकाचे नुकसान तर कधी माणसावर हल्ले करून अनेकानी जीव गमावले आहेत.तर शेतकर्याच्या पिकांचे लाखो रूपयाचे नुकसान केले आहे.
गेल्या वर्षबरापासुन हत्तीने तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.
नुकताच सावरगाळी (ता .खानापूर) येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील याच्या शिवारात ऊसाचे नुकसान तर केलेच त्याच बरोबर जलकुंभ, पाण्याचे पंप,शिवाय शेतीच्या आवजाराची मोडतोड करून लाखो रूपयाचे नुकसान केले आहे. ही घटना ताजी असतानाच !
मानिकवाडीच्या आप्पाणा गावडे यांच्या उसाचे नुकसान!
माणिकवाडी ( ता खानापूर ) गावचे शेतकरी आप्पाणा देवाप्पा गावडे याच्या सर्वे नंबर ७४ मधील शिवारात हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे.
त्याच्या शिवारातील जवळपास २५ टन उस जमिनदोस्त करून टाकला आहे.त्यामुळे त्या शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
हा हत्ती महिण्याबरापासुन गुंजी वनविभागात ठाण मांडुन बसला आहे.मात्र वनखाते हत्तीचा बंदोबस्त करण्यात साफ अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यातुन संताप व्यक्त होत आहे.यासाठी हत्तीच्या बंदोबस्तासाठी तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय तालुक्यातील शेतकर्यानी घेतला आहे.
दुसरीकडे उस वाहतुकीसाठी साखर कारखाण्याकडुन टोळ्याची व्यवस्था वेळेत होत नाही.त्यामुळे शेतकरी व्दिदा अवस्थेत सापडला आहे.
असे मत शिंदोळी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रा शंकर गावडा यानी बोलताना सांगीतले .